कार्यक्रम आणि उपक्रम
भोंडला व दांडिया कार्यक्रम २०२४-२५
रेणुका स्वरूप इन्स्टिटयूट ऑफ करिअर कोर्सेस मध्ये बुधवार दि.१६ ऑक्टोबर २०२४ रोजी भोंडला व दांडियाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात रेणुका स्वरूप ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनीअतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेल्या पथनाट्याने झाली. हल्ली पाश्चिमात्य संस्कृती प्रमाणे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. तर आपली संस्कृती आपल्याला काय सांगते त्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी काय काय करायला हवे हे सर्व या पथनाट्यातून सांगण्यात आले.
भोंडल्याची सुरुवात संचालिका मा. शुभांगी कांबळे व समन्वयिका मा.सारिका वाघ यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
भोंडल्याची गाणी गाण्यासाठी बालवाडी प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर मुलींनी गरबा व दांडियाचा आनंद लुटला.
संचालिका मा.कांबळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण भोंडला का साजरा करतो, आपली संस्कृती व तिचे जतन हे महत्त्व पटवून दिले.
सर्वात शेवटी प्रत्येक विभागाची व इन्स्टिट्यूटची खिरापत ओळखून त्याचा सर्वांनी एकत्र बसून आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली लेले यांनी केले.
'श्रावणसरी' सोहळा
'मएसो रेणुका स्वरूप इन्स्टिटयूट ऑफ करिअर कोर्सेस' मध्ये 'श्रावणसरी' सोहळ्याच्या निमित्ताने सर्व कोर्सेस च्या प्रशिक्षणार्थींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. *काव्यवाचन, मेंदी, रांगोळी, गीतगायन, हेअर स्टाईल, सुंदर जाहिरात, पाककला, श्रावणगौरी अशा अनेक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
दि. २० ऑगस्ट रोजी
सकाळच्या सत्रात विशेष ठरलेली *श्रावण गौरी स्पर्धा* घेण्यात आली. सर्व स्तरातील सहभागी महिला स्पर्धकांनी आपली परंपरा, संस्कृती तसेच अनेक कला याबाबत आपली कल्पकता सादर केली. सर्व स्पर्धांसाठी आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या परीक्षक लाभल्या होत्या.
दुपारच्या सत्रात शासनमान्य बालवाडी कोर्स व टीचर्स ट्रेनिंग कोर्स विभागाच्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यानंतर सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करून विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थीनी *मा. सायली हनमघर* यांना आमंत्रित करण्यात आले होते. इन्स्टिट्यूट मध्ये टीचर्स ट्रेनिंग कोर्स केल्यानंतर त्यांनी स्वतःची शाळा सुरू केली आहे.
सांगता कार्यक्रमांमध्ये रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूटच्या *महामात्रा मा. डॉ. मानसी भाटे मॅडम, संस्थेच्या संचालिका मा. कांबळे मॅडम व समन्वयिका सौ. सारिका वाघ * उपस्थित होत्या.
'श्रावणसरी' उत्सवा निमित्ताने इन्स्टिट्यूट मधील महिलांच्या सूप्त गुणांना वाव मिळाला, त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अनेक महिलांनी त्यांचे कलागुण पहिल्यांदाच मंचावर सार्वजनिक रित्या सादर केले. यातून त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला. श्रावणातील या रंगतदार कार्यक्रमाने इन्स्टिट्यूटमधील वातावरण अधिक आनंदी व स्नेहमय केले.
म. ए. सो रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झाले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या मा. आशा ताई राणे व मा. अतिथी सायली मराठे उपस्थित होत्या. यावेळी पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच बालवाडी व टीचर्स ट्रेनिंग कोर्स विकेंड बॅच व यार्दी बॅच यांचा निकाल 100% लागला.
यावेळी आपलं मनोगत सांगताना बालवाडीच्या प्रशिक्षणार्थी पुनम इंगळे यांनी सांगितले की घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना शिक्षणाचा विचार केला नाही, मी कधी परिस बघितला नाही पण येथे आल्यानंतर परिस काय असतो याची मला कल्पना आली व माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला.
तर अश्विनी कर्डीले यांनी आपल्या मनोगत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करियर इन्स्टिट्यूटने केले असे सांगितले.
टीचर्स ट्रेनिंग विकेंड बॅच, यार्दी बॅच मधील मुलींनीही आपलं मनोगत व्यक्त करताना करिअर बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, करिअर मध्ये येऊन त्यांच्या मध्ये ही कसा आत्मविश्वास निर्माण झाला त्याचे वर्णन त्यांनी केले .
मान्यवर अतिथी सायली मराठे यांनी मुलींची संवाद साधताना आपण कोणते शिक्षण घेतो व त्याचा उपयोग पुढे होतोच असे नाही, तुमच्या कडे कल्पना शक्ती असायला हवी, नेहमी आपण म्हणतो की पैसा नाही जागेची अडचण अशा अनेक अडचणी आपण सांगत असतो पण त्यावर जर मात तुम्ही कल्पनाशक्तीने केली तर काहीही अवघड नाही, मिळालेल्या संधीचे तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.आशाताई राणे यांनी मुलींना मार्गदर्शन करतांना, बालकाचा विकास हा महत्त्वाचा विषय आहे असे सांगितले, तीन ते सहा ही वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत बालकाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आहेत यामध्ये बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक भावनिक सामाजिक विकास होत असतो, त्यांनीही संधीचं सोनं करावं असं सांगितलं.
मा.आशाताई राणे यांनी मुलींना मार्गदर्शन करतांना, बालकांचा विकास हा महत्त्वाचा विषय आहे असे सांगितले, तीन ते सहा ही वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत बालकाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आहेत यामध्ये बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक भावनिक सामाजिक विकास होत असतो, त्यांनीही संधीचं सोनं करावं असं सांगितलं.
म.ए.सो. रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक २५-४-२०२५ रोजी "चैत्र गौरी हळदी कुंकू" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे स्टॉल , फनी गेम्स चे स्टॉल लावले होते. सर्व विभागांच्या विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.विद्यार्थिनींनी चैत्रगौरीची आकर्षक सजावट केली होती.
इन्स्टिट्यूटच्या महामात्रा मा. डॉ. मानसी भाटे मॅडम यांच्या हस्ते चैत्र गौरीचे पूजन व आरती करण्यात आली. यानंतर कार्यक्रमात टॅली, फॅशन, पार्लर या गव्हर्मेंट व ऑटोनॉमस कोर्सच्या विद्यार्थिनींना मा.डॉ. मानसी भाटे मॅडम व संचालिका मा. शुभांगी कांबळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.यानंतर डॉ. मानसी भाटे मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टीटीसी व बालवाडी विभागाच्या विद्यार्थिनींनी केले. शेवटी मुलींना डाळ कैरी व पन्हे देऊन सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.